एका छोट्याशा चुकीमुळे तुम्ही पीएम किसान योजनेच्या लाभार्थी यादीतून बाहेर जाऊ शकता

PM kisan yojana पीएम किसान योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार (central government) शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला सहा हजार रुपये पाठवते. विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यावर चार महिन्यातून एकदा 2000 रुपये प्रमाणे हे पैसे जमा होतात.

वर्षातून तीनदा शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले जातात. आतापर्यंत शेतकऱ्यांच्या (farmer scheme) खात्यावर १३ हप्ते आले आहेत. १४ व्या हप्त्याची शेतकरी वाट पाहत आहेत.

ई-केवायसी करणं अनिवार्य

पीएम किसान योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा असल्यास ई-केवायसी करणे अधिक गरजेचं आहे. समजा तुम्ही अजूनही ई-केवायसी केली नसेल, तर यापुढे तुम्हाला पीएम किसान योजनेचा लाभ घेता येणार नाही. परंतु अजून त्यासाठी संधी उपलब्ध आहे. तुम्ही पीएम किसान पोर्टलवरती जाऊन ई-केवायसी करु शकता. त्याचबरोबर तुम्ही सीएससी केंद्रावर जाऊन सुध्दा ही सगळी माहिती भरू शकता.

ई केवायसी कशी करायची?

सुरुवातीला तुम्हाला पीएम किसान पोर्टलवर जावं लागेल तिथं तुम्हाला समोरचं ईकेवायसी असा ऑप्शन दिसेल
तिथं तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकावा लागेल. त्यानंतर सर्चवर क्लिक करावं लागेल.
त्यानंतर तुमच्या मोबाईलवर ओटीपी येईल तो ओटीपी तिथं टाकावा लागेल. त्यावेळी तुमची ई-केवासीची प्रक्रिया पुर्ण होते.

पीएम किसान लाभार्थी यादीत नाव येथे पहा

पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी..

या योजनेचा फायदा घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे आधार कार्ड, त्याचबरोबर त्यांचं बँकेत/पोस्टात खातं असणं गरजेचं आहे. जमीनीचे सातबारा रहिवासी दाखला, त्याचबरोबर जमीनीची पडताळणी करणे सुध्दा गरजेचे आहे. वरीलपैकी एक जरी डॉक्युमेंट नसेल तर त्या व्यक्तीला पीएम किसान योजनेचा लाभ मिळू शकत नाही. पीएम किसान योजनेत सहभागी होण्यासाठी या वरील बाबी अनिवार्य आहेत नसता या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना घेता येणार नाही.

Home Page

Leave a Comment