ई-केवायसी अद्ययावत करणाऱ्या शिधापत्रिकाधारकांना यापुढे धान्य मिळणार आहे. जिल्ह्यात ई-केवायसीसाठी विशेष शिबिरे घेतली जाणार आहेत.
केंद्र सरकारच्या नवीन एकात्मिक अन्नसुरक्षा योजनेस १ जानेवारी २०२३ पासून प्रारंभ करण्यात आला आहे. अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबाला पुढील पाच वर्षांसाठी मोफत धान्य देण्यास सुरूवात करण्यात आली.
अंत्योदय योजनेतील प्रत्येक शिधापत्रिकेवर प्रत्येक महिन्याला ३५ किलो धान्य दिले जाते. त्यामध्ये गहू १५ किलो, तर तांदूळ २० किलो दिला जातो. त्याचबरोबर एक किलो साखर दिली जाते. जिल्ह्यात ८७ हजार ९५० अंत्योदयचे शिधापत्रिकाधारक आहेत.
तहसीलदार घेणार बैठक
प्रत्येक तालुक्यातील शिधापत्रिकाधारकांची ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी स्वस्त दुकानदारांची बैठक तहसीलदार घेणार आहेत.त्याबाबत तहसीलदार यांना सूचना देण्यात आल्या असल्याचे पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.
ई-केवायसीसाठी लागणारे कागदपत्रे
- कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधारकार्ड
- उत्पन्नाचा दाखला
- घरपट्टी किंवा इलेक्ट्रीकल बिल
- बँक पास बुक झेरॉक्स
अन्य उपलब्ध कागदपत्रे
- दिव्यांग असल्यास प्रमाणपत्र
- गॅसचे पासबुक
- जातीचे प्रमाणपत्र
राशन कार्ड यादीत नाव येथे पहा