Maharashtra Farmers Loans : महाराष्ट्रात पुन्हा शेतकरी कर्जमाफी, मुख्यमंत्र्यांचे विधानसभेत विधान..
Maharashtra Farmers Loans : अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे झालेल्या नुकसानीपोटी केवळ १ हजार ८५१ कोटी रुपयांची मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली. सभागृहात विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी शेतकरी प्रश्नावर प्रस्ताव दिला होता. त्यावर बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी, धानासाठी दोन हेक्टरच्या मयदित १५ हजारांऐवजी २० हजार रुपये मदतीची घोषणा केली.
महाराष्ट्रात पुन्हा शेतकरी कर्जमाफी होणार काय म्हणाले मुख्यमंत्री पहा
तसेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी कृती दलाचे पुनर्गठन करण्याचा निर्णय झाल्याचे त्यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेचे पोर्टल सुरू करण्यात येणार असून साडेसहा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या नुकसानीचे प्राथमिक पंचनामे जवळपास सुरू आहेत. ३२ जिल्ह्यांपैकी २६ जिल्ह्यांचे पंचनामे पूर्ण झाले असून परभणी, अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया आणि चंद्रपूर या सहा जिल्ह्यातील पंचनामे थोडेफार बाकी आहेत.
आतापर्यंत ९ लाख ७५ हजार ५९ हेक्टरचे क्षेत्र बाधित झाले आहे. यासाठी अंदाजे दोन हजार कोटींची मदत द्यायची आहे. जसजसे पंचनामे होतील तसतशी मदत ‘डीबीटी’द्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
विरोधी पक्षाकडून आरोप
मुख्यमंत्री शिंदे जुन्याच घोषणा व आकड्यांचा खेळ करून शेतकऱ्यांच्या प्रश्नापासून पळ काढत आहेत. ‘अग्रिम’च्या नावाखाली शेतकऱ्यांना पीक विमा देण्यात आला नाही. आता शेतकऱ्यांना १५५३ रुपयांची अग्रिम दिल्याचे सांगण्यात आले. ही रक्कम त्यांना खूप मोठी वाटत असेल तर मुख्यमंत्री, कृषिमंत्री आणि एकूणच मंत्रिमंडळ शेतकऱ्यांबाबत सरकार किती संवेदनशील आहे? हे यावरून दिसून येते असे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले.
महाराष्ट्रात पुन्हा शेतकरी कर्जमाफी होणार