Kanyadan Yojana | सरकार करणार मुलींच्या लग्नाचा खर्च; जाणून घ्या योजना आणि पात्रता?

Kanyadan Yojana | सरकार या योजनेअंतर्गत करते मुलींच्या लग्नाचा खर्च; जाणून घ्या योजना आणि पात्रता

Kanyadan Yojana मुलगी झाल्यावर आई-वडिलांना खूप आनंद होतो. परंतु मुलीच्या जन्मासोबतच त्यांना तिच्या शिक्षण, लग्नाची खूप जास्त काळजी लागलेली असते. त्यामुळे मुलीचे जन्मानंतरच पालक तिच्या लग्नासाठी काही ना काही बचत ठेवत असतात.

अगदी लहान असल्यापासूनच लग्नासाठी येणारा खर्च आणि महागाईचा विचार करता, पालक त्यांच्या मुलींसाठी काही ना काही पूंजी जपून ठेवतात. परंतु आता राज्य सरकारने समाजातील नागरिकांची ही गोष्ट लक्षात ठेवून एक नवीन योजना सुरू केलेली आहे. आपले सरकार हे समाजातील विविध घटकासाठी नवनवीन योजना आणत असतात. ज्याचा फायदा सगळ्यांनाच होत असतो आणि आता मुलींच्या लग्नासाठी देखील सरकारने एक नवीन योजना राबवलेली आहे.

राज्य सरकारच्या या योजनेचे नाव कन्यादान योजना( Kanyadan Yojana) आहे. या योजनेअंतर्गत अनुसूचित जातीच्या पालकांना मुलीच्या लग्नासाठी सरकारमार्फत काही आर्थिक मदत केली जाते. गरीब कुटुंबातील लोकांना मुलीच्या लग्नासाठी मधील मदत व्हावी. आणि त्यांनी जास्त भार घेऊ नये. यासाठी सरकारने ही योजना सुरू केलेली आहे. लग्नासाठीचा खर्च कमी व्हावा. यासाठी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना प्रोत्साहन दिले जाते. आणि यासाठी महाराष्ट्र सरकारने ही योजना राबवलेली आहे. आता या योजनेबद्दल आपण माहिती जाणून घेऊया.

कन्यादान योजना काय? | Kanyadan Yojana

राज्य सरकारच्या या कन्यादान योजनेअंतर्गत नवीन लग्न झालेल्या जोडप्याला सरकारतर्फे 25000 हजार रुपयांच्या आर्थिक मदत केली जाते. मुलीच्या आई-वडिलांच्या नावाने ही मदत केली जाते. म्हणजेच तिच्या मुलीच्या आई वडील लग्नासाठी हे पैसे वापरू शकतात. परंतु या योजनेअंतर्गत जर 25000 हजार रुपयांचा लाभ घ्यायचा असेल, तर त्या मुलाला आणि मुलीला सामूहिक विवाह सोहळ्यात सहभागी होऊन लग्न करावे लागतील. त्याचप्रमाणे सरकारी या योजनेमध्ये विवाह सोहळा आयोजित करणाऱ्या संस्थेला 4 हजार रुपये देखील देतात.

योजनेसाठी पात्रता आणि अटी काय आहे ?

  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणारे वधू आणि वर हे महाराष्ट्राचे रहिवासी असावे
  • तसेच नवरा किंवा नवरीपैकी एक जण हा अनुसूचित जाती जमातीचा असावा.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी घराचे वय हे कमीत कमी 21 वर्षे तर वधूचे वय कमीत कमी 18 वर्षे असणे गरजेचे आहे.
  • वधू आणि वरांच्या केवळ प्रथम विवाहसाठी हे अनुदान दिले जाणार आहे.

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

 

Home

Leave a Comment